‘आठवण मित्रांची'
खुप दिवस झाले दोस्ता
अजूनही भेट नाही,
काय सांगू मित्रा
ते दिवस का येत नाही...
लहानपापासूनची साथ
मित्रांची ती खास असे,
आठवत राहतील जुने मित्र
हृदयात माझ्या आस असे...
दिवस आठवले गावा आडचे
रमलेल्या त्या खेळांमध्ये,
डाव आपला लपाछपीचा
जमलेल्या त्या मुलांमध्ये...
सर्व मित्र मिळून आपण
जेव्हा मस्ती- खोड्या करीत होतो,
तो क्षण आठवणीत घेऊन मित्रा
तुझ्या आठवणीत रडत होतो...
जरी मित्रा तू झाला आफिसर
मित्रांची खरी साथ तुला,
भेटशील जीवनात कधी पुन्हा
ती खरी मैत्रिंची आस मला...
- प्रितम मदनराव जांभूळकर, वर्धा ( ७७०९५५५३६७)
0 Comments