*महाराष्ट्र देशा*
मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणारा अख्खा महाराष्ट्र माझा व ज्या देशात सोनेरी रंगाचा धुर निघत असे अशी उपमा ज्या देशाला आहे तो भारत देश माझा...
एके दिवशी बसस्थानासमोर आठ ते दहा टपोळी मुलांचा गटसमुह गप्पा करत होता तेवढ्यातच एक तरुणी चेहऱ्याला रुमाल बांधून बसस्थानासमोर येत असता त्याच वेळी गप्पा करीत असलेले तरुण त्या तरुणीच्या अवतीभवती फिरु लागली, काही तिला स्पर्श करु लागली एका मिनिटाचा विलंब न होता त्या तरुणीने चेहऱ्यावरचा रुमाल सोडला...मात्र त्यापैकीच एक तरुण त्या बाकी तरुणांना तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागला. असे का झाले असावे? कारण ती त्या एका तरुणाची बहिण तर नव्हती ना!... हो, ती त्याचीच बहिण होती.मग खऱ्या अर्थानं प्रत्येक तरुणी ही कुणाची तरी बहिण झाली ना! मग ती तरुणी कोणतीही असू द्या. प्रत्येकाने तरुणीला माझी बहिण म्हणून जर अवलोकनात आणले ना तर,आपल्या देशातील अथवा महाराष्ट्रातील अत्याचारांचे प्रमाण हळूहळू कमी झाल्याशिवाय राहणार नाही.
राष्ट्रसंत तकडोजी महाराज फार सुंदर लिहितात- व्यसन सगळे सोडोणी सत्कर्माला लाग जरा | मानवा तु माणुसकीला जाग जरा ||
पण मित्रांनो आज होणारे अत्याचार पाहून आपल्याला आपल्यातील माणुसकी नावाची एक गोष्ट हराविल्याचे आढळून येते. एक ज्वलंत मुद्दा म्हणजे आज असं एकही वर्तमानपत्र नाही की ज्यामध्ये अत्याचार, आतंकवाद आणि गुन्हेगारी या संदर्भात बातमी छापून येत नाही. मग आज काय झालं? एका पोलिस उपनिरीक्षक याने स्वतःच्या घरात घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केला. माझा आक्षेप पोलिसांवर नाही परंतु या संदर्भात खऱ्या अर्थानं आपल्याला सुरक्षा देणारेच जर असे वागतील तर, आपण सुरक्षा मागावी तरी कोणाला? हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न माझ्या आणि तुमच्या देखील सामोर उभा असणारच!...
निर्भया अत्याचार प्रकरणं, अशिफा वरील अत्याचार आणि आता हे हैदराबाद मधील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करून जाळून हत्या असेल व हिंगणघाट येथे प्रध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळणे असो. देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण विक्रमी वेगाने वाढत असल्याचे दिसते. दर सत्तर मिनिटांमागे एक हुंडाबळी जात असल्याची नोंद राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालात व्यक्त झाली आहे. तसेच दर दहा मिनिटामागे एका महिलेला अत्याचाराचा सामना करावा लागतो. संपूर्ण देशात सरासरी सोळा मिनिटांमध्ये एका महिलेवर बलात्कार होत असल्याची आकेवारी स्पष्ट होते.
आज नेमकं देशात झालं काय ? तर २० वर्षीय तरुण आज बलात्कार करु लागला आहे,१९ वर्षीय तरुण वडीलधाऱ्या माणसांसमोर दारू पितो आहे आणि १८ वर्षीय तरुण खूण करतो आहे.
मग मला विचारू द्या ,
"जहाँ डाल-डाल पर
सोने की चिड़ियां करती है बसेरा
वो भारत देश है मेरा" हे म्हणणे या ठिकाणी योग्य ठरणार !
मनःपूर्वक धन्यवाद....🙏🏻
लेखक : प्रितम मदनराव जांभूळकर. बी.ई. व्दितीय वर्ष.
(स्वच्छ भा. मि. ब्रँडअॅम्बेसेडर जि. वर्धा, महाराष्ट्र राज्य तथा युवा कवी पुरस्कृत). ✍🏻✍🏻
संपर्क :- ७७०९५५५३६७.
0 Comments